आयुष्य ना , एखाद्या दवबिंदू सारखं असलं पाहिजे . छोटसंच ,
पण असं की , Living Life to it's Fullest !!
तसं पाहिलं तर दवबिंदू
असतो काय ? एक थेंब पाण्याचा ?
का फक्त एक क्षण? काळाच्या कुशीत गोठून गेलेला? जगणं आणि मरणं दैवाच्या आधीन केलेला ?
खरंच , जगता आलं पाहिजे एखाद्या दवबिंदू सारखं ,
एकदातरी.
पाणी असून वाहता न आल्याचं दु:ख नाही , किंवा
मोत्यासारखं दिसलो याचा गर्व नाही.
तुम्ही कधी ऑबझर्व केलंय का एखाद्या दवबिंदूला ?
त्यामध्ये सूर्याला स्वत:त पाहण्याची ताकद असते. पण तरीही तो एखाद्या निर्मल भावने
इतकाच हळवा सुद्धा असतो.
त्यामुळे , जेवढं जगलो तेवढं असं जगावं कि जगात
किमान एक जण तरी कोणी असं असावं , कि ज्याला आपल्या “असण्याने” आणि “नसण्याने”
सुद्धा फरक पडतो.
असं जगता आलं ना ... की मग किती जगलो याला काही
महत्व उरत नाही.
“जगलो” हेच खरं देणं , जगाचं .. जगाला परत
दिलेलं ....
एखाद्या “दवबिंदू” सारखंच ...... !!
............................ केदार ०३/०८/२००७
7 comments:
केदार खुप च्हान लिहिलय. असच लिहित रहा वेगवेगळ. बर वाटत. आपण इतकं च्हान लिहीणाय्राचे मित्र आहोत याचा अभिमान वाटतो.
sahi re...mast lihile ahes! Waiting for more..;)
वा!!
keep it up
असं लिहीत सुटलं की लिहायचं व्यसन मात्र लागतं हं
सो सावधान :-)
Wonderful .. apratim lihala aahes re :) yup, davbindu .. .one of the beautiful things in the life :)
Wonderful .. apratim lihala aahes re :) yup, davbindu .. .one of the beautiful things in the life :)
tooooooo good.....awadala ekadam...mana pasun !!!
अप्रतिम आहे खरच तू एवढ छान कधी पासून लिहितोयेस? असो शुभेछ्या .....
Post a Comment